Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्यपान  >>  प्रमुख वार्ता

खरात दांपत्याचे सदस्यत्व रद्द करा : "तीर्थक्षेत्र' ची मागणी वाई, दि. 16 : तीर्थक्षेत्र आघाडीतून अधिकृतरित्या निवडून येऊन हेतूपुरस्सर स्वेच्छेने जनकल्याण आघाडीत सामील झालेल्या नगराध्यक्षा सौ. नीलिमा खरात व त्यांचे पती, नगरसेवक दत्तात्रय उर्फ बुवा खरात यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी तीर्थक्षेत्र आघाडीने राजकीय लढाईस प्रारंभ केला आहे. त्या संबंधी तीर्थक्षेत्र आघाडीच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांच्याकडे आपली याचिका दाखल केली.

Thursday, May 17, 2012 AT 12:52 AM (IST)

नवी दिल्ली, दि. 16 (वृत्तसंस्था) : मास्टर ब्लास्टर, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची कोणत्या आधारे राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली, अशी विचारणा दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी सरकारला केली. सचिनला राष्ट्रपतींद्वारे राज्य-सभेवर नियुक्त करण्याच्या विरोधात दिल्लीचे माजी आमदार राम-गोपालसिंह सिसोदिया यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.        त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने सरकारला ही विचारणा केली.

Thursday, May 17, 2012 AT 12:56 AM (IST)

मुंबई, दि. 16 (प्रतिनिधी) : राज्यातील जलसिंचनाबाबत येत्या 15 दिवसांत श्र्वेतपत्रिका काढण्यात येईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. राज्यातील 15 टंचाईग्रस्त तालुक्यांना कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी प्रत्येकी 10 कोटी रुपये देण्याचा निर्णयही सरकारने घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत विषयपत्रिकेवर नसलेल्या श्र्वेतपत्रिकेच्या विषयावर चर्चा झाली.

Thursday, May 17, 2012 AT 12:51 AM (IST)

मुंबई शेअर बाजारही कोसळला मुंबई, दि. 16 (वृत्तसंस्था) : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने बुधवारीऐतिहासिक निचांकी पातळी गाठत रुपयाच्या तुलनेत डॉलर 54 रुपये 43 पैशांवर गेला. परिणामी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 340 अंकांनी घसरुन तो 16 हजारांखाली गेला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलरची मागणी वाढल्यामुळे रुपयांचे अवमूल्यन झाले. याशिवाय परकीय संस्थांनी भारतीय बाजारातून पैसा काढल्यामुळे रुपयावर प्रतिकुल परिणाम झाला.

Thursday, May 17, 2012 AT 01:07 AM (IST)

सातारा फेस्टिव्हलचा दिमाखात प्रारंभ सातारा, दि. 16 : महेश मांजरेकर प्रस्तुत आणि "फू बाय फू' फेम वैभव मांगले, भालचंद्र कदम आणि कलाकारांनी सादर केलेल्या "गाव गेलो करुन' या दोन अंकी नाट्यप्रयोगाने सातारकरांना खळखळून हसवले. या नाट्यप्रयोगाने सातारा फेस्टिव्हलचा दिमाखात प्रारंभ झाला. येथील तालीम संघाच्या मैदानावर श्रीमंत अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे "सातारा फेस्टिव्हल 2012' चे आयोजन करण्यात आले आहे.

Thursday, May 17, 2012 AT 01:16 AM (IST)

हरकती व सूचनांसाठी मुदतीत वाढ कराड, दि. 16 : कराड नगरपालिकेच्या दुसऱ्या विकास आराखड्याबाबत दिलेल्या हरकती व सूचनांचा विचार न करता शासनाने तो मंजूर केला आहे. यासंदर्भात बुधवारी पालिकेच्या शिष्ट-मंडळाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेवून गाऱ्हाणे मांडले. त्यावेळी शासनस्तरावर योग्य मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, अशी सकारात्मक भूमिका ना. चव्हाण यांनी घेतली.

Thursday, May 17, 2012 AT 01:18 AM (IST)

सातारा, दि.16 : आचार्य विनोबा भावे, साने गुरूजी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या-प्रमाणेच देश-राज्याला विचार देणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण यांची वैचारिक जडणघडण, नवीन विचारांची पेरणी तुरूंगात झाली. त्या वैचारिक शिदोरीचा वापर यशवंतरावांनी भावी काळात देशाच्या, राज्याच्या राजकारण व समाजकारणासाठी केला.

Thursday, May 17, 2012 AT 01:20 AM (IST)

कातरखटाव नजिकची घटना   वडूज, दि. 16 : कातरखटाव (ता. खटाव) नजिक शेवाळेवस्तीवर लहान बाळावर चाकू रोखून धरत अज्ञात चोरट्यांनी सुमारे सव्वा लाख रुपये किंमतीचे दागिने लंपास केले. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अंकुश तुकाराम शेवाळे यांचे कातरखटाव नजिक शेवाळे नावाच्या वस्तीवर घर आहे.

Thursday, May 17, 2012 AT 01:05 AM (IST)

मुंबई, दि. 16 (प्रतिनिधी) : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील दहा जिल्ह्यांमधील 42 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा आणि काही ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्यासाठी 24 जून 2012 रोजी मतदान घेण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. यामध्ये सातारा जिल्ह्यातील 6 ग्रामपंचायतींचाही समावेश आहे. नामनिर्देशनपत्रे 5 जून 2012 ते 9 जून 2012 या कालावधीत स्वीकारण्यात येतील.

Thursday, May 17, 2012 AT 01:04 AM (IST)

चाफळ, दि. 16 : माथणेवाडी, ता. पाटण येथील युवक मंगळवार, दि. 15 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घरातून कोणलाही काहीही न सांगता निघून गेल्याची फिर्याद नातेवाईकांनी चाफळ पोलिसांत दाखल केली आहे. विशाल प्रकाश माथणे (वय 22) असे बेपत्ता झालेल्या युवकाचे नाव आहे. दरम्यान, उत्तरमांड धरणाच्या काठावर या युवकाच्या चपला व गाडीची चावी आढळून आल्याने धरणाच्या पाण्यात तो बुडाला असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Thursday, May 17, 2012 AT 01:03 AM (IST)

© Copyrights 2012 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: