Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
ऑस्करच्या 82 व्या पुरस्कार सोहळ्यात "द हार्ट लॉकर' या चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी कॅथरिन बिगलो हिला "ऑस्कर' पुरस्कार घोषित झाला आणि  साऱ्या जगात ती प्रसिध्दीच्या झोतात आली. ऑस्करच्या इतिहासात दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळवणारी ती पहिली महिला दिग्दर्शक! "दि हार्ट लॉकर', या युध्दपटाचं उत्कृष्ट दिग्दर्शन तिनं केलं तेव्हा, या चित्रपटाला ऑस्करचा पुरस्कार मिळेल, असं हॉलिवूडच्या ख्यातनाम निर्माते आणि दिग्दर्शकांनाही वाटलं नव्हतं.

Thursday, March 11, 2010 AT 10:04 PM (IST)

तेलंगणा राज्याच्या स्थापनेसाठी आंध्र प्रदेशातल्या हिंसक आंदोलनात आता, विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरु झाल्याने, मुख्यमंत्री रोसय्या सरकारसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. गेल्या तीन महिन्यात आंध्र प्रदेशातल्या तेलंगणा विभागातल्या हिंसक आंदोलनात हैद्राबादच्या उस्मानिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनीच अधिक भाग घेतला. विद्यापीठाचा परिसर वारंवार अशांत होऊ लागल्यामुळे, तेथे आता केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या बंदोबस्तासाठी ठेवण्यात आल्या आहेत.

Wednesday, March 10, 2010 AT 09:54 PM (IST)

बहुजन समाज पक्षाचे संस्थापक काशीराम आणि स्वत:चे शेकडो पुतळे, उद्याने उभारण्यावर पाच हजार कोटी रुपयांचा निधी उधळणाऱ्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावतींनी आता, राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. गेल्या आठवड्यात प्रतापगड जिल्ह्यातल्या मानगडमध्ये झालेल्या कृपालू महाराजांच्या आश्रमातील चेंगराचेंगरीत 63 जणांचे बळी गेले. शंभर स्त्री-पुरुष गंभीर जखमी झाले.

Wednesday, March 10, 2010 AT 12:52 AM (IST)

शेतकरी कामगार पक्षाच्या सोळाव्या राज्य अधिवेशनात डॉ. एन. डी. पाटील यांनी अत्यंत आक्रमक शैलीत, अखंड महाराष्ट्राची फाळणी करायसाठी उतावळ्या झालेल्या नतद्रष्ट विदर्भवाल्यांना फटकारले, ते योग्य झाले. वयाच्या 83 व्या वर्षीही हा वृध्द युवा  कर्नाटकच्या जोखडात अडकून पडलेल्या पंचवीस लाख मराठी भाषिकांची मुक्तता करायसाठी झुंंजतो आहे. सेनापती बापट, एस. एम. जोशी, जयंतराव टिळक, मधु दंडवते हे सीमा लढ्यातले नेते काळाच्या पडद्याआड गेले.

Tuesday, March 09, 2010 AT 12:52 AM (IST)

  शांततेच्या मार्गाने न्याय्य हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या वसई-विरारमधल्या, शेकडो निरपराध्यांची डोकी फोडणाऱ्या सैतानी वृत्तीच्या संबंधित पोलीस आणि अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करून, गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी या घटनेची न्यायालयीन चौकशीच करायला हवी. पोलीस खात्याची खाकी वर्दी अंगावर चढली म्हणजे, लोकांना मरेपर्यंत बदडून काढायचा, गंभीर जखमी करायचा, महिलांची विटंबना करायचा अधिकार पोलीस खात्याला नाही.

Monday, March 08, 2010 AT 01:47 AM (IST)

  सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यातले ऐनावडे हे आडवळणी गाव! या गावातल्या नामदेव जगन्नाथ पवार या विद्यार्थ्याने खूप शिकायचा निर्धार केला. घरची परिस्थिती अत्यंत बेताची. घरात शैक्षणिक वातावरण नव्हतेच. पण, या शेतकरी कुटुंबातला हा मुलगा गावातल्याच शाळेत शिकून पुढे शिवाजी विद्यापीठातून बी. एस्सी.  आणि एम. एस्सी.  गुणवत्तेसह उत्तीर्ण झाला. पुणे विद्यापीठातून या विद्यार्थ्याने भूगर्भशास्त्रातली पीएच. डी. पदवीही संपादन केली.

Saturday, March 06, 2010 AT 12:48 AM (IST)

  अत्तरांच्या निर्मितीत जागतिक क्षेत्रात, भारतीय अत्तरांचा दबदबा निर्माण करणारे, गोविंद दामोदर उर्फ भाऊसाहेब केळकर यांच्या निधनाने सर्वार्थाने सुगंधी माणूस काळाच्या पडद्याआड गेला आहे. केळकर मुळचे कोकणातले. त्यांचे वडील आणि काकांनी 1922 मध्ये एच. एस. केळकर कंपनीची स्थापना करून अत्तर उद्योगात पाऊल टाकले. हा उद्योग पूर्णपणे नवखा असतानाही, या दोघांनी संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या अत्तरांच्या निर्मितीचा ध्यास घेतला.

Thursday, March 04, 2010 AT 11:47 PM (IST)

  कर्नाटकातल्या अल्पसंख्याक समुदायाला भडकायला कोणतेही साधे कारण पुरते. आपल्या धर्माचा अवमान झाल्याच्या आरोळ्या पिटत, अल्पसंख्याकांचा समुदाय संतप्त रस्त्यावर उतरतो आणि दंगल पेटवून सर्वसामान्यांना आपल्या दावणीलाही बांधतो. कर्नाटकातल्या एका कन्नड दैनिकात बांगलादेशच्या वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरिन यांचा लेख रविवारी प्रसिध्द झाला. प्रेषित महंमद पैगंबर हे बुरख्याच्या विरोधात होेते, असा मजकूर त्या लेखात होता.

Thursday, March 04, 2010 AT 12:23 AM (IST)

  पाकिस्तानच्या तालावर नाचणाऱ्या हुर्रियत परिषदेने काहीही झाले, तरी काश्मीर खोऱ्यात कायमस्वरुपी शांतता नांदू द्यायची नाही, असा निर्धारच केला आहे. काश्मीर खोऱ्यात कुणी आत्महत्या केली, तरी त्याचे खापर पोलीस आणि सुरक्षा दलावर फोडून हुर्रियत परिषद आंदोलनाचा नारा देते. गेल्या दोन वर्षात काश्मीर खोऱ्यात येणाऱ्या देश विदेशातून पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

Tuesday, March 02, 2010 AT 10:25 PM (IST)

  आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पात चार टक्क्यांनी वाढ करून संरक्षण खात्यासाठी 1 लाख 47 हजार 340 कोटी रुपयांच्या निधीची केलेल्या तरतुदीचा पूर्णपणे विनियोग होईल, अशी अपेक्षा आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात या खात्यासाठी त्या आधीच्या वर्षीच्या तरतुदीपेक्षा तब्बल 34 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. परंतु संरक्षण खात्याच्या सुसज्जतेसाठी दिलेल्या संपूर्ण निधीचा वापर मात्र, झाला नाही, ही बाब खेदजनक ठरते.

Tuesday, March 02, 2010 AT 01:31 AM (IST)

MadhuMilan
Jobs In My Circle
ePaperGallery
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: