Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कर्मतत्त्वाप्रमाणे हल्लीच्या परिस्थितीत विषमता आमच्या पूर्वकर्मांनी उत्पन्न केली आहे. यावरुन असे दिसते की, आमच्या पूर्वजन्मातही कर्मे, वासना, इच्छा यातील वैचित्र्य असले पाहिजे. काहीजण पूर्वजन्मी रोगी, कित्येकजण दरिद्री तर काही श्रीमंत असले पाहिजेत. हे भेद कशाने झाले? याचे उत्तर असे आहे की, त्याही पूर्वीच्या जन्मातील संस्कारभेदाने. तिसऱ्या जन्मातील विषमता त्याही पूर्वीच्या म्हणजे चौथ्या जन्मातील संस्कारभेदाने.

Saturday, September 04, 2010 AT 01:00 AM (IST)

तुम्ही ईश्वराला जाणता म्हणजे काय? ईश्वर तुमच्यामध्ये आहे, तुमच्या शरीरात वसत आहे असेच ना? "राम' म्हणतो की, "शरीर आणि हे जग ईश्वरामध्ये आहे' आणि "मी ईश्वर आहे' या दोन कल्पनांत फार अंतर आहे. त्याने "आत्म्याचा' त्याग केला म्हणजे देह हेच काय ते त्याचे सर्वस्व, खरे स्वरुप आहे आणि आत्मा ही त्यावर लादलेली बाह्य वस्तू आहे, असे होते. हिंदू लोक म्हणतात की, आत्मा मी आहे. जीर्ण वस्त्राप्रमाणे हे शरीर टाकून देऊन मी दुसरे धारण करतो.

Thursday, September 02, 2010 AT 10:50 PM (IST)

हिंदुस्थानात सर्व लोकांची नव्हे, पण जे खरे धार्मिक आहेत त्यांची दृष्टी याहून अगदी भिन्न असते. "आधी स्वर्गीचे राज्य - प्रभूकृपा संपादन करा म्हणजे तुम्हाला इतर सर्वकाही मिळेल,' हे ख्रिस्ताचे वचन येथे अस्पष्ट ऐकू येते. पण, हिंदुस्थानात या वचनावर फार जोर दिला जातो, आणि सर्वांच्या मनावर ते चांगले ठसविले जाते.

Wednesday, September 01, 2010 AT 10:50 PM (IST)

आता आपण काही प्रश्नांकडे वळू. काल किंवा परवा एकाने "रामा'ला असा प्रश्न केला की, महाराज, आपण काय शिकविता? तुम्हाला आत्मा आहे काय? आत्म्याच्या अस्तित्वाविषयी तुम्ही उपदेश करता का? आत्मा आहे असे आपण मानता काय? रामाने उत्तर दिले, छे, मला आत्मा नाही. हे ऐकून त्याला फार आश्चर्य वाटले. आत्म्याचे अस्तित्व न मानणारा हा कसला राक्षसी धर्म असावा! "मला आत्मा नाही.

Tuesday, August 31, 2010 AT 11:07 PM (IST)

प्रथम लोकांच्या मनात येणाऱ्या सर्व प्रश्नांसंबंधी येथे हे जाहीर केले पाहिजे की, युरोपियन किंवा अमेरिकन तत्त्ववेत्त्यांपेक्षा हिंदुस्थानातील तत्त्ववेत्त्यांची विषयप्रतिपादनशैली निराळी आहे. हिंदुस्थानातील तत्त्ववेत्ते प्रथम एखाद्या विषयाचे विवेचन करतात आणि नंतर त्या विषयावरील आक्षेपांचा आणि शंकांचा विचार करतात. "रामा'ला याच मार्गाने जावे लागले आहे. नाना तऱ्हांच्या शंकांचे त्याला समाधान करुन घ्यावे लागते.

Monday, August 30, 2010 AT 11:16 PM (IST)

मनुष्य पुन्हा बोका, कुत्रा यांच्या जन्माला जातो काय? हे सर्व मनुष्याच्या परिस्थितीवर अवलंबून राहील. पुढील जन्म सद्य: परिस्थितीवर अवलंबून आहे. याविषयी एक गोष्ट सांगतो. भगवान बुध्दापाशी दोन गृहस्थ आले. एकाने विचारले, "महाराज, माझ्या स्नेह्याला पुढील जन्मी कोणती गती प्राप्त होईल? हा नेहमी मनामध्ये कुत्र्याचा विचार बाळगतो आणि कुत्र्याप्रमाणे कर्म करतो.

Sunday, August 29, 2010 AT 09:31 PM (IST)

क्षुद्र वासना, आनुवंशिक समजले जाणारे रोग याविषयींचा खुलासा समजला. पण, क्षयरोग हा वासनांमुळे कसा उत्पन्न होतो हे समजत नाही. आमच्या भुकेचा, अन्नाकांक्षेचा तर तो परिणाम नसेल ना? वेदांताप्रमाणे, अत्याहार आणि अजीर्ण, उद्वेग किंवा विषाद उत्पन्न करणाऱ्या अन्नाचे सेवन, हेच सर्व पापांचे मूळ आहे. अजीर्णाच्या विकारामुळे, तुम्ही रागावता आणि सर्व प्रकारची पापे करण्यास प्रवृत्त होता. तुमचा आनंद कमी करणारी कोणतीही गोष्ट वेदांतदृष्ट्या पाप आहे.

Saturday, August 28, 2010 AT 11:16 PM (IST)

"स्वाभाविक' या शब्दाविषयी हजारो लोकांचा गैरसमज झालेला आहे. या शब्दाच्या नावाखाली अनेक दुर्गुणांना व पापांना आश्रय व उत्तेजन मिळत आहे. याकरिता या शब्दाचा अर्थ स्पष्ट केला पाहिजे. मनामध्ये येणाऱ्या सर्व कामना, वासना, पशुवृत्ती या "स्वाभाविक' आहेत. आमच्या मनाला दाबून ठेवणारे लगाम सैल करा, वासनारुपी अश्वांना यथेच्छ मोकळे सोडा, आम्ही स्वतंत्र होऊ या असे काही लोक म्हणतात. त्यांची ही स्वतंत्रता म्हणजे, पशुवृत्तीचे जीवन होय.

Saturday, August 28, 2010 AT 12:06 AM (IST)

सद्‌गुण आणि दुर्गुण यातील भेद किंवा याची मर्यादा काय आहे हे कृपा करुन सांगा. वेदांताप्रमाणे सद्‌गुण व दुर्गुण हे सापेक्ष शब्द आहेत. येथे अमुक ठिकाणी दुर्गुण संपतो आणि सद्‌गुण सुरु होतो, असे तुम्हाला नक्की सांगता येत नाही. एक शिडी किंवा सोपान आहे असे समजा. त्यावरुन तुम्ही वर गेला की तो सद्‌गुण, खाली आला की तो दुर्गुण.

Thursday, August 26, 2010 AT 11:02 PM (IST)

प्रवाही स्थितीची-सूक्ष्म शरीराची प्रगती सूर्याच्या सत्तेने होत असते. सूर्याचा प्रकाश आणि उष्णता ही जसजशी सूक्ष्म शरीराला मिळावी तसतसे ते अधिक विरल होऊ लागते. मनुष्याला जसजसे आत्मज्ञान अधिक होते, तसतसे त्याचे सूक्ष्म शरीर अधिक विरल होते आणि त्याची बरीच प्रगती होते. त्याचे सूक्ष्म शरीर विरल-बाष्परुप झाल्यामुळे त्यात ते देहरुपी घटात असले तरी-सूर्याचे प्रतिबिंब पडत नाही. प्रतिबिंब किंवा मिथ्या अहंकार सूर्याशी एकरुप होऊन जातो.

Wednesday, August 25, 2010 AT 11:21 PM (IST)

© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: