Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्यपान  >>  प्रमुख वार्ता

  कराड, दि. 5 : दिल्लीत आणि महाराष्ट्रात कॉंग्रेसची सत्ता आहे पण, तेथून मिळणारा निधी थेट जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची सत्ता कॉंग्रेसच्या ताब्यात असणे गरजेचे आहे. तुम्ही जिल्हा परिषद व पंचायत समिती ताब्यात द्या, विकासासाठी मोठा निधी देण्याचीच नव्हे तर विकासात झुकते माप देण्याची माझी जबाबदारी आहे. आज केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांतून भरीव निधी देण्याचे काम होत आहे मात्र त्या निधीचा योग्य विनियोग होत नाही.

Monday, February 06, 2012 AT 03:03 AM (IST)

वडूज, दि. 5 : लुंग्या-सुंग्यांच्या प्रचारार्थ नुसत्या डिझेलच्या खर्चावर सभा करणाऱ्यांनी आमची मापे काढू नयेत. माण-खटावच्या सरहद्दीवर स्वाभिमानी औद्योगिक प्रकल्प लवकरच सुरू होणार असल्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखू लागले आहे. त्यात भरीस भर म्हणून आपल्या उमेदवारांना मिळणारा वाढता पाठिंबा पाहून विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.

Monday, February 06, 2012 AT 03:06 AM (IST)

  दहिवडी, दि. 5 : राज्याच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारकडून निधी उपलब्ध केला जातो. दोन्ही ठिकाणी कॉंग्रेसचे सरकार आहे. त्यामुळे निधीबाबत चिंता करु नका. माण व खटावच्या विकासासाठी आ. जयकुमार गोरे यांनी सुचवलेले सर्व प्रकल्प पूर्ण करणार आहे. निधी देणारे हात कॉंग्रेसचे आहेत तर मत घेणारे हातही कॉंग्रेसचे असले पाहिजेत, असे सांगून जिल्हा परिषद व पंचायत समितीवर कॉंग्रेसचा झेंडा फडकवावा, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

Monday, February 06, 2012 AT 03:13 AM (IST)

  चेन्नई, दि. 5 (वृत्तसंस्था) : भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेची व्यापारी शाखा असलेल्या अँट्रिक्स आणि देवास मल्टिमिडिया यांच्यात झालेल्या करारात अनियमितता तर आढळलीच पण, इस्त्रोचे तेव्हाचे अध्यक्ष माधवन नायर आणि अन्य तीन वैज्ञानिक दोषी असल्याचा निष्कर्ष महालेखापालांनी केलेल्या चौकशी अहवालात काढल्याचे रविवारी स्पष्ट करण्यात आले. या एकतर्फी करारामुळे केंद्र सरकारचे 2 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे अनुमान महालेखापालांनी काढले आहे.

Monday, February 06, 2012 AT 03:08 AM (IST)

फलटण, दि. 4 : जिल्हा परिषदेची सत्ता राष्ट्रवादीकडे कायम ठेवून या जिल्ह्याचे सुपुत्र व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा सन्मान करण्याची संधी लाभली आहे. त्याचा उपयोग करुन राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी करा आणि ना. पवार यांचा सन्मान वाढवा, असे आवाहन पालकमंत्री श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले. राष्ट्रवादीच्या फलटण तालुक्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ सांगवी येथे झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.

Sunday, February 05, 2012 AT 02:17 AM (IST)

मल्हारपेठ, दि. 4 : पंढरपूरहून दापोलीकडे जाणारी खाजगी मिनी बस शनिवारी दुपारी 2 च्या सुमारास कराड-चिपळूण हमरस्त्यावरील निसरे येथे उलटून झालेल्या अपघातात 13 वारकरी जखमी झाले. बसमध्ये सर्व वारकरी असून ते माघवारीचे दर्शन घेऊन परतत असताना हा अपघात झाला. या अपघाताची फिर्याद जखमी तुकाराम पड्याल यांनी मल्हारपेठ पोलीस दूरक्षेत्रात दिली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शनिवारी दुपारी 2 च्या सुमारास निसरे, ता.

Sunday, February 05, 2012 AT 02:25 AM (IST)

पुणे, दि. 4 (वृत्तसंस्था) : राष्ट्रकुल घोटाळा प्रकरणी जामीनावर मुक्त झालेल्या खा. सुरेश कलमाडी यांचे शनिवारी पुण्यात आगमन होताच, अनेक समर्थकांनी त्यांचे भव्य मिरवणुकीने स्वागत केले. गेल्या आठवड्यात जामीन मिळाल्यानंतरही ते राजधानी दिल्लीतच होते. तब्बल 9 महिने 11 दिवसांनी ते पुण्यात परतले. त्यांना जामीन मिळाल्यावर पुण्यातल्या त्यांच्या समर्थकांनी कॉंग्रेस कार्यालयात फटाकेही वाजवले होते.

Sunday, February 05, 2012 AT 02:27 AM (IST)

खटाव, कोरेगाव, फलटण, खंडाळा, जावली, कराड तालुक्यात सभा कराड, दि. 4 : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे रविवारी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्यामुळे जिल्ह्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या बोचऱ्या टीकेला ना. चव्हाण काय उत्तर देणार? याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले आहे.

Sunday, February 05, 2012 AT 02:30 AM (IST)

""न्यायालयाचा निर्णय आपल्या बाजूने लागेल अशी आशा आपल्याला होती. पण, आपण आपला केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा तयार ठेवला होता.''   टू जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरण   नवी दिल्ली, दि. 4 (वृत्तसंस्था) : अवघ्या दोनच दिवसांपूर्वी टू-जी स्पेक्ट्रमचे 122 परवाने रद्द करुन सर्वोच्च न्यायालयाने चपराक हाणल्याने, कोंडीत सापडलेल्या केंद्र सरकारला पतियाळा विशेष न्यायालयाने, केंद्रीय गृहमंत्री पी.

Sunday, February 05, 2012 AT 02:24 AM (IST)

ढेबेवाडी येथील दोन युवकांचा समावेश : गावावर शोककळा कराड, दि. 4 : कराड तालुक्यातील नारायणवाडी आणि कोपर्डे हवेली येथे शुक्रवारी रात्री झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात ढेबेवाडी येथील दोन युवकांसह ट्रॅक्टर चालक जागीच ठार झाला. सुरज धनंजय पाटील व शैलेश विलासराव पाटील (रा. ढेबेवाडी) अशी दुर्दैवी युवकांची नावे आहेत. या घटनेमुळे ढेबेवाडी गावावर शोककळा पसरली.

Sunday, February 05, 2012 AT 02:28 AM (IST)

© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: